नवी मुंबई, दि.
२८ : “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी
यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर, नवी मुंबई येथे आयोजित भव्य कार्यक्रमात
बंजारा समाजातील महिलांनी पारंपरिक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
रंगीत
पारंपरिक वेशभूषा आणि आकर्षक दागिने परिधान करून सादर केलेल्या नृत्यामुळे कार्यक्रमस्थळी
उत्साहाचे आणि सांस्कृतिक ऐक्याचे वातावरण निर्माण झाले. विविध राज्यांतून आलेल्या
भाविकांनी या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली.
समागमाच्या निमित्ताने
धर्म, संस्कृती आणि परंपरांचा संगम पाहायला मिळाला. बंजारा समाजाच्या महिलांनी आपल्या
सादरीकरणातून एकता, बंधुता आणि सांस्कृतिक वैविध्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमाच्या
माध्यमातून गुरु ग्रंथ साहिब यांच्या शिकवणीनुसार समता आणि मानवतेचा विचार अधिक दृढ
करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
00000
No comments:
Post a Comment