महाराष्ट्रातील
८५ टक्के आदिवासी लोकसंख्या ही शेती व्यवसायाशी निगडीत आहे. त्यापैकी ४० टक्के आदिवासी शेतकरी असून ४५ टक्के
आदिवासी शेतमजूर आहेत म्हणून आजही आदिवासींची अर्थव्यवस्था कृषी व कृषी संलग्न व्यवसायावर अवलंबून आहे. कृषी व्यवसायाच्या विकासासाठी राबविण्यात येणा-या
योजनांची माहिती देणारा हा लेख …….
|
आदिवासी शेतक-यांना
विजपंप / तेलपंप पुरवठा करणे.
महाराष्ट्र
शासनाने आदिवासींच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. १. आदिवासी
शेतक-यांना त्यांचा शेतीविकास किफायतशीरपणे होण्याच्या दृष्टीने उपलब्ध
असलेल्या साधनाचा व उर्जेचा पुरेपुर
उपयोग करुन त्याव्दारे जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली आणुन आदिवासींचा आर्थिक विकास साधण्याच्या हेतुन १०० टक्के अनुदानावर
विजपंप / तेलपंप पुरविण्यात येत आहे. २. या योजनेखाली सर्वसाधारण पणे ३ किंवा ५ अश्वशक्तीचे विजपंप / तेलपंप मंजूर
करण्यात येतात. ३. राज्यातील आदिवासी
उपयोजना क्षेत्र व क्षेत्राबाहेरील आदिवासी शेतक-याकडे किमान ६० आर (दीड एकर) आणि कमाल ६ हे.४० आर (१६ एकर) इतकी
लागवाडीयोग्य जमीन उपलब्ध आहे. अशा शेतकरी या
योजनेचा लाभ घेवु शकतात.
या योजनेसाठी पात्रता :१. आदिवासी शेतक-यांना विजपंप मंजूर करतांना त्यांच्या शेतातील पाण्याचे साधन असलेल्या विहिर / नाल्यास कमीत कमी सहा महिने पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. २. आदिवासी शेतकरी स्वत: जमीन कसत असला पाहिजे. ३. ६०आरपेक्षा कमी जमीन ज्यांच्या नांवाने असेल अशा किंवा ३ लगतच्या जमीन धारकांना एकत्रित येऊन करार लिहुन दिला तर एका पेक्षा अधिक लाभधारक एकत्रितपणे या योजनेचा लाभ घेऊ शकतील. मात्र अशा एकत्रित आलेल्या शेतक-यांची एकूण जमीन ६०आरपेक्षा जास्त असली पाहिजे. ४. या योजनेखाली ज्या गांवात / शेतात विजपुरवठा केला जावु शकतो त्या गावच्या शेतक-यास विजपंप व जेथे वीजपुरवठा केला जात नाही अथवा नजीकच्या ३ वर्षात केली जाण्याची शक्यता नाही अशा ठिकाणी तेलपंप पुरविण्यात येतो.
केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युक्लिअस बजेट)
ज्या योजनाचा समावेश
अर्थसंकल्पात नाही अशा अभिनव स्वरुपाच्या स्थानिक महत्वाच्या कर्जविरहीत योजना
तातडीने व प्रभावीपणे कार्यान्वित करुन गरजु आदिवासींना प्रत्यक्ष लाभ मिळवुन देणे
हा योजनेचा मुख्य उद्देश. आदिवासी व्यक्ती / कुटूंब केंद्रबिंदु मानुन या योजनेतंर्गत
कर्ज देणे अपेक्षित नाही. योजनेचे स्वरुप खालीलप्रमाणे
१.योजनेतंर्गत प्रत्येक
आदिवासी व्यक्तीस / कुटूंबास / सामुहिक प्रकल्पात / कार्यक्रमातंर्गत आर्थिक मर्यादा रु. १५०००/- पर्यंत, ४ गट नमूद केले असुन अ)
उत्पन्न निर्मितीच्या किंवा वाढीच्या योजना ब) प्रशिक्षणाच्या योजना क) मानवी साधनसंपत्तीच्या
विकासाच्या योजना ड) आदिवासी कल्याणात्मक योजना.
3.
अ या गटात अनुदानाची मर्यादा खालीलप्रमाणे.
१)
सर्वसाधारण आदिवासी लाभार्थी - ८५ टक्के व १५टक्के वैयक्तिक सहभाग
२)
आदिम जमाती लाभार्थी – ९५ टक्के व ५ टक्के
वैयक्तिक सहभाग
३)
जेथे अर्थसहाय्य रु. २००० असेल तेथे १०० टक्के अर्थसहाय्य.
४).
शासन निर्णय दि. ३१ मे २००१ च्या मार्गदर्शक सुचनातील अटी शर्तीनुसार पात्र लाभार्थी
व त्यांनी मागणी केल्या नुसार योजना तयार करुन प्रकल्प अधिकारी यांनी अपर आयुक्ताकडे
निर्देश समितीचे अध्यक्ष या नात्याने मंजुरी घेणे.
५)
योजना मंजुरीचे अधिकार रु. ७.५० पर्यंतच्या अपर आयुक्त, आदिवासी विकास रु. ७.५० ते
३०.०० लक्षपर्यंतची योजना आयुक्त, आदिवासी विकास व रु. ३०.०० लक्ष पेक्षा जास्त रकमेच्या
योजनेस शासनाची मान्यता अधिकार प्रदान
६)
अर्थसंकल्पात तरतूद असलेल्या एखाद्या योजनेवर अत्यावश्यक आणि अपवादात्मक परिस्थितीत
पुरक खर्च न्युक्लिअस बजेट मधुन करावयाचा असल्यास प्रस्ताव मंजुरीसाठी आयुक्त, आदिवासी
विकास यांच्याकडे सादर करणे.
७)
शासनाने विहित केलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार जे कार्यक्रम न्युक्लिअस बजेट अंतर्गत
देता येत नाहीत परंतु स्थानिक परिस्थितीनुसार खास कार्यक्रम घेणे आवश्यक आहे असे निर्देश
समितीस वाटल्यास त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर करणे.
या
योजनेसाठी पात्रता खालीलप्रमाणे आहेत.
१.
लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा.
२.
अ या गटासाठी लाभार्थी दारिद्रय रेषेखालील असावा.
३.
लाभार्थीनी सर्व कागदपत्रासह योजनेच्या लाभासाठी विहित नमुन्यातील अर्ज सादर करणे आवश्यक.
४.
योजनेशी संबंधित विविध खात्याच्या जिल्हास्तरावरील अधिकारी यांचे सहकार्याने व समन्वयाने
योजना
राबविणे.