Monday 8 August 2016

अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी सेवायोजन नोंदणी

अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी सेवायोजन नोंदणी
            महाराष्ट्र हे पुरोगामी आणि प्रगतीशील राज्य आहे.  कृषी, औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राची प्रगती  उल्लेखनीय आहे.  समाजातील अनुसूचित जाती, जमाती यांच्या आर्थिक, शैक्षणिक हितांचे संरक्षण करणे ही शासनाची घटनात्मक जबाबदारी आहे.  यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवून शासन त्याची अंमलबजावणी करते.
अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची नाव नोंदणी सेवायोजन कार्यालयात करण्यात येत होती. परंतू या उमेदवारांना संधी मिळण्यास फार विलंब होतो हे लक्षात घेऊन शासनाने मागासवर्गीयांच्या नाव नोंदणीचे काम समाजकल्याण विभागावर सोपविले. १९८४-८५ मध्ये आदिवासी विकास विभाग स्वतंत्र झाल्यानंतर हे काम प्रकल्प कार्यालयांकडे सोपविण्यात आले. गरजू, सुशिक्षित अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची नावे नोंदवून तो विविध भरती अधिका-यांकडे शिफारस करुन पाठविणे व त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
नांव नोंदविण्याच्या अटी पुढीलप्रमाणे आहेत.

नाव नोंदणीसाठी उमेदवार अनुसूचित जमातीचा असावा, त्याने विहित नमून्यात जन्मतारीखेचा दाखला, शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज केला पाहिजे.   या योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्राचे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment